रामनवमी:Ramnavmi भगवान रामाचा आत्मीय उत्सव

भगवान रामाचा जन्मदिवस राम नवमी-Ramnavmi म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहास अनुसार भारत हे एक पवित्र स्थान आहे जिथे असंख्य देवी देवतांनी भौतिक रूप धारण केले आहे. इतिहासात असे सांगितले जाते की, जेव्हा रावणाचे दुष्कृत्य वाढले आणि लोक संतप्त झाले तेव्हा या अत्याचारांचा अंत करण्यासाठी भारतीय भूमीवर एक वीर जन्माला आला होता हे भव्य महापुरुष प्रभू राम म्हणून ओळखले जातात.

रावणाच्या अत्याचारांचा अंत करण्यासाठी आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. प्रभू राम यांचा जन्म त्रेता युगात झाला होता.

प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक विशेष अर्थ असतो. पृथ्वीवरील वाईट शक्तीचा पराभव आणि सामान्य लोकांना भयंकर त्रासापासून वाचवण्यासाठी देवाचे आगमन दर्शवते असे मानले जाते. प्रभू राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. भगवान राम यांनी जगाला रावणाच्या राजवटीतून मुक्त केले.

रामराज्य निर्माण केले. भारतामध्ये रामनवमी हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भगवान रामाचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेश, भारतातील आयोध्या शहरात झाला होता. भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता म्हणून हा सण चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहेत. श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आदर्श दैवत आहेत. जग कल्याणासाठी धर्मरक्षणासाठी दृष्टांच्या निर्धारणासाठी भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले होते, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार आहे. श्रीराम यांचा जन्म त्रेता युगात झाला होता.

अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी यांना एकच दुःख होते कि त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केले.

यज्ञ देवता अर्थात अग्नीनारायण हे प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तिन्हीं राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या पुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली. श्रीराम हे श्री रामायण या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र, पती, बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष प्रजापालक, श्रीराम हे पित्र वचनपालक मात्र भक्त एकवचनी आणि आदर्श असे व्यक्तिमत्व होय.

श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरूंच्या यज्ञाचे धर्माचे रक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे आयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारे प्रजा आनंदित असतानाच मात्र पित्र आज्ञाचे पालन करीत त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्यांची राक्षस सेना यांचा वध केला.

मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. श्री रामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसूनही प्रतिष्ठीत जीवनाचे उत्तम उदाहरण मांडले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला आदर्श सोडला नाही आणि जीवन सन्मानाने जगले. श्रीरामाचे जीवन त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य हे सारच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय आहे.

अशा या आदर्श देवतांची आपल्याला सदैव आठवण राहावी. तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे श्री जन्माचे राम जन्माचे निमित्त आहे. रामनवमी म्हणजे राम जन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

काही ठिकाणी रामायण ग्रंथाचे वाचन, राम कथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रमाही केले जातात. मध्यान काळी म्हणजे दुपारी बारा वाजता राम जन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव साजरा केला जातो.

कित्येक राम मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. रामायणाचे पारायण, कथा, कीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होतो. या दिवशी श्रीरामाचे व्रतही केले जाते.

राम नवमी हा उत्सव चैत्र महिन्यात नवमीला साजरा केला जातो. चैत्र महिन्यात दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि नवरात्री पाळली जाते. नवरात्रीचा नऊ वा दिवस म्हणजेच रामनवमी असंख्य लोक या दिवशी लहानपणी पोशाख केलेल्या भगवान रामाच्या प्रतिमेची पूजा करतात नवरात्रीच्या दरम्यान काही लोक नऊ दिवसांचा उपवास करतात नंतर ते शेवटच्या दिवशी भगवान रामाची पूजा केल्यानंतर आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर उपवास तोडतात.

भगवान रामाचा मानवतेला संदेश आहे की, सतत न्याय, दया आणि ईश्वरभक्ती पूर्ण जीवन जगा. त्याची शिकवण इतरांबद्दल सहानुभूती आणि आदर दाखवणे, गरजूंना मदत करणे. जगभरातील कित्येक लोक भगवान रामाच्या जीवनातून आणि शिकवणींनी प्रेरित आहेत आणि त्यांचा न्याय करून आणि प्रेमाचा संदेश लोकांना चांगला जीवनाकडे नेतो.

भारताच्या काही भागांमध्ये रामनवमीच्या दिवशी मिरवणुका काढला जातात. भक्त रथ किंवा पालखीवर भगवान राम आणि सीता यांच्या मूर्ती घेऊन जातात आणि त्यांच्या स्तुतीमध्ये भजन आणि भक्ती गीते जातात काही ठिकाणी मंदिरामध्ये या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

श्रीराम यांनी त्यांचे बालपण आयोध्याच्या राजवाड्यात घालवले. जिथे त्यांनी विविध कला, विज्ञान आणि युद्ध कलेचे उत्कृष्ट शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले. ते एक समर्पित मुलगा भाऊ आणि मित्र होते. त्यांचे त्यांच्या भावंड आणि चुलत भावांसोबत घडनिष्ठ संबंध होते. प्रभू राम मोठे झाल्यानंतर त्यांनी मिथिला राजाची राजकन्या सीता हिच्याशी विवाह केला सीता तिच्या सौंदर्य शहाणपणा आणि प्रभू राम भक्तीसाठी ओळखली जात होती आणि त्यांचा विवाह हिंदू पुराणातील कथा मधील सर्वात आशीर्वादित संघापैकी एक मानला जातो.

पण काही काळानंतर भगवान रामाचे वडील राजा दशरथ यांनी त्यांच्या एका पत्नीला केलेल्या वचनामुळे त्यांना 14 वर्षासाठी आयोध्येतून हद्दपार व्हावे लागले. प्रभू राम सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह ते स्वेच्छेने वनवासात गेले आणि पुढील 14 वर्ष विविध आव्हाने आणि धोक्यांना तोंड देत ते भारतातील जंगलात राहिले.

14 वर्षाचा वनवास संपून प्रभू राम अयोध्येला परतले जिथे त्यांचे लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करत होते त्यांना आयोध्येचा राजा म्हणून गौरवण्यात आले आणि त्यांनी करुणा आणि अंत दृष्टीने शासन करून आपल्या लोकांचे कल्याण आणि समृद्धी केली प्रभू रामाचा कारभार हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो जो शांतता समृद्धी आणि न्यायासाठी ओळखला जातो. प्रभू रामांचे जीवन मौल्यवान धडे आणि शिकवणींनी भरलेले आहेत जे की जगभरातील लोकांना प्रेरणा देतात

प्रभू राम सर्व प्राणीमात्रांबद्दल त्यांच्या करुणेसाठी ओळखले जात होते आणि प्रत्येकाशी आदर आणि दयाळूपणे वागत असे. त्यांचा अहिंसा किंवा अहिंसेच्या तत्त्वावर विश्वास होता आणि आवश्यकते शिवाय कोणाचेही नुकसान केले नाही.

Leave a comment