भारताचे संविधान

  • भारताचे संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा कायदा मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्य निर्धारित करणारी चौकट मांडतो.
  • भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.
  • संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. तेथील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. म्हणून भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय “संविधान दिवस” म्हणून साजरा करतात.
  • इंग्रज सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांनी देशात स्वदेश निर्मित संविधान निर्माण करण्याची योजना आखली.
  • भारत पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती केल्यानंतर इंग्रजांची देशातील हुकूमत संपेल आणि इंग्रज आपला भारत देश सोडून निघून जातील अशी घोषणा केल्यानंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या देशातील प्रशासन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी संविधान निर्माण करण्याची योजना आखली. त्याकरिता एक घटना समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या अध्यक्षपदाकरिता 1946 साली निवडणुका घेण्यात आल्या.
  • पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेचे उल्लेखनीय सदस्य होते. ज्यांची निवड सर्व भारतीय राज्याच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांनी केली होती.
  • 9 डिसेंबर 1946 साली घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे पार पडले. त्या समितीचे हंगामी अध्यक्ष हे डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे होते.
  • 11 डिसेंबर 1946 साली घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. या घटना समितीचे सल्लागार हे बी. एन. राव होते. तसेच या घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या. त्यापैकी मसुदा समिती हि महत्वाची मानली जाते.
  • 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते.
  • आपल्या देशात लोकशाही प्रजासत्ताक आहे. सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षतेमुळे ते इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे आहे.
  • पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि इतर हे संविधान सभेचे उल्लेखनीय सदस्य होते.
  • मूळतः संविधानात 395 अनुच्छेद 22 भाग आणि 8 अनुसूची होत्या. आता भारतीय संविधानात 448 अनुच्छेद 25 भाग आणि 12 अनुसूची आहे.
  • घटना समितीचे कामकाज पूर्ण करण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ काळ कालावधी लागला.
  • सध्या अस्तित्वात असलेली भारतीय राज्यघटनेची रचना ही केवळ एकाच्या नव्हे तर असंख्य व्यक्तींच्या अथक परिश्रमाचे फलित आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे निर्माते आणि जनक म्हणून संबोधले जाते, परंतु इतर बऱ्याच लोकांनी आश्चर्यकारक गोष्टी साध्य केल्या आहेत.
  • पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वज तयार केला.
  • सध्याची निवडणूक प्रणाली थॉमस हेअर यांनी विकसित केली होती.
  • नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनिकेतच्या कारागिरांनी भारतीय राज्यघटना सजवली.
  • 1934 मध्ये भारतीय राज्यघटनेची कल्पना करणारे  श्री एम. यन. राव हे पहिले होते. म्हणून त्यांना साम्यवादी विचारसरणीचे पहिले शोधक म्हणून संबोधले जाते. या व्यतिरिक मूलतत्त्ववादी लोकशाहीचे जनक म्हणून संबोधले जाते.
  • भारतीय राज्यघटनेचे संघराज्य आणि एकात्म स्वरूप तिला अद्वितीय बनवते.
  • भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही जगातील सर्वोत्कृष्ट मानली जाते, त्यावर अमेरिकन राज्यघटनेचा प्रभाव आहे.
  • प्रस्तावना भारतीय राज्यघटनेची मुख्य तत्वे, मागण्या, उद्दिष्टे प्रकट करते. आम्ही भारताचे लोक हे प्रस्ताविकेतील पहिले वाक्यप्रचार आहे. ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, संविधान आपले अधिकार थेट लोकांकडून घेते.
  • भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण 284 सदस्यांनी सह्या केलेले आहेत. संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द फ्रान्सच्या संविधानातून घेण्यात आलेले आहेत.
  • 42व्या घटनादुरुस्तीला लघुराज्य घटना असे देखील म्हटले जाते.
  • भारतीय संविधानाची मूळ प्रत ही पूर्णतः हस्तलिखित आहे.
  • भारतीय संविधानाची प्रत प्रेमबिहारी नारायण रायझादा यांच्या हस्ते लिहिण्यात आले आहे.
  • भारतीय संविधानाने आपल्या भारतीय जनतेला अशा स्वरूपाचे मूलभूत हक्क दिले आहेत त्यामुळे, आपण आपल्या देशात मुक्तपणे संचार करू शकतो. एक चांगले आणि आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपणास आपल्या देशाच्या संविधानाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपला भारत देश हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे.

Leave a comment