दक्षिण महाराष्ट्रातील Sangali Jilha सांगली हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो.
मुख्यालय – Sangali सांगली
क्षेत्रफळ – 8578 चौकिमी
स्थान व विस्तार – सांगलीच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस व वायव्येस सातारा, उत्तरेस व ईशान्येस सोलापूर.
तालुके(10) – मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, शिराळा (32 शिराळा), वाळवा, पलूस, कडेगाव.
महानगरपालिका(1) – सांगली-मिरज-कुपवाडा (1988)
नद्या – कृष्णा ही प्रमुख नदी आहे. याव्यतिरिक्त वारणा, येरळा, बोर, माणगंगा.
धरणे – वारणा नदीवरील चांदोली धरण.
पिके – गहू, ज्वारी, ऊस, हळद, तंबाखू, हरभरा.
संगमस्थळ – ब्र्ह्मनाल(येरला,कृष्णा), हरिपूर(कृष्णा,वारणा).
धबधबा – कंधार (वारणा नदीवर)
खनिज – शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते.
लेणी – हरिपूर, करगणी
तलाव – आटपाडी, लांडगेवाडी, वायाफले, अंजनिपेठ, भोसे, संख, खंडेराजुरी, कोसारी.
मृदा – पिवळसर, तांबूस, तपकिरी व काळी मृदा.
किल्ले – मच्छिंद्रगड , प्रचीतगड, रामदुर्ग, बागणी भुईकोट किल्ला.
- चांदोली राष्ट्रीय उद्यान (२००४) सातारा, सांगली कोल्हापूर, रात्नागरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
- सांगलीचा हळदीचा वायदे बाजार प्रसिद्ध आहे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ( चांदोली राष्ट्रीय उद्यान) शिराळा तालुक्यात आहे.
- सागरेश्वर(यशवंतराव चव्हाण) अभयारण्य (1985)कडेगाव तालुक्यात आहे.
- सदाहरित व शुष्क पानझडी वने सांगली जिल्ह्यात आढळतात.
- सांगली येथे कृष्णेच्या काठावर गणेश दुर्ग हा किल्ला आहे. येथील आकाशवाणी केंद्र विशेष लोकप्रिय आहे.
- मिरज हे प्रमुख जंक्शन आहे.
- वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली येथे आहे.
- औदुंबर येथे दत्तात्रेय मंदिर आहे.
- मिरज येथील मिरासाहेब अवलिया दर्गा येथील ऊरुस प्रसिद्ध आहे. या उरसास 640 वर्षाची परंपरा आहे.
- 32 शिराळा येथील नागपंचमी प्रसिद्ध आहे. जिवंत नागांची मिरवणूक काढण्याच्या प्रथेस पर्यावरणवाद्याच्या विरोधामुळे 2002 पासून बंदी आहे. येथे गोरखानाथ व मारुती मंदिर आहे.
- तासगाव येथे उजव्या सोंडेचा गणपती आहे.
- कडेगाव येथील मोहरम प्रसिद्ध आहे.
- देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे.
- खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ बाबाची चैत्री यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेतील जातिवंत माणदेशी खिलार बैलांचा बाजार प्रसिद्ध आहे.
- सांगलीला महाराष्ट्राची “नाट्य पंढरी” असे म्हणतात.
- सांगलीला हळदीचा जिल्हा असे म्हणतो.
- दक्षिण महाराष्ट्रातील अतिपूर ग्रस्त जिल्हा सांगली जिल्हा आहे.
- सांगलीमध्ये दिग्रस या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे.
- मिरज येथे तंतुवाद्य निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे.
- बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस )यांचा जन्म सांगली जिल्ह्यात नागठाणे या ठिकाणी झाला होता.