Ratnagiri Jilha रत्नागिरी हा पश्चिम किनाऱ्यावरील व कोकण प्रशासकीय विभागातील प्रमुख जिल्हा आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे.
मुख्यालय – Ratnagiri रत्नागिरी
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 8208 चौकीमी.
स्थान व विस्तार – पूर्वेस सह्याद्री व त्यालगत सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग, उत्तरेस रायगड जिल्हा.
तालुके(9) – रत्नागिरी, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, लांजा.
समुद्रकिनारा – रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे.
नद्या – जगबुडी(खेड), वाशिष्ठी(चिपळूण), शास्त्री(संगमेश्वर), अर्जुना व कोदवली(राजापूर), मुचकुंदी, जोग.
संगमस्थळ – खालसवाडी (शास्त्री व बाव), संगमेश्वर(शास्त्री व सोनवी)
नदीकाठावरील ठिकाणे – चिपळूण(वशिष्ठी), दापोली(जोग), राजापूर(काजवी), खालासवाडी(शास्त्री).
गरम पाण्याचे झरे – राजवाडी (ता.संगमेश्वर), उन्हवरे (ता.राजापूर), आरवली.
पुळन (beach) – अरेवारे(गणपतीपुळे),भाट्ये(ता.दापोली), कशेडी, गुहाघर.
धरणे – नातूवाडी, अर्जुना, सोंडेघर, सुकोंडी, शीड, पणदेरी, शिरवली, कोंडीवली, फणसवाडी, आंबतखोल, मोर्डे, गडनदी.
पिके – भात, नाचणी, वरी.
फळे – हापूस आंबे, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस,
खनिज संपत्ती – जांभा चिरा, डोलोमाइट, चीनिमती, मंडणगड तालुक्यात बॉक्साईटचे साठे, शिरगोळा हा रांगोळीचा दगड, कुरुंद हा जात्याचा दगड.
शैक्षणिक – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली(स्थापना 18 मे 1972)
तलाव – तुळशी, शेल्डी, पंचनदी, निवे, मालघर, व्हेल, केळवली, फानासवाडी, शील, आसुर्डे.
लेणी – खेड, पान्हाळकाजी, चिपळूण, संगमेश्वर.
गड – सुवर्णदुर्ग, पूर्णगड, जयगड, प्रचीतगड, पासगड, मंडणगड, महिपतगड, रसाळगड, महिमागड, गोपाळगड, सुमारगड, रत्नगड.
वने – उष्ण कटिबंधीय निमसदाहारीत वने.
प्रमुख ठिकाणे – संगमेश्वर तालुक्यात दाभोळे घाटात गंगोत्री नदीवर मार्लेश्वर(धारेश्वर) धबधबा व शिवमंदिर आहे.
- दापोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. याला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात.
- चिपळूण तालुक्यात पोफळी या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.(कोयना धरणातील पाण्यापासून)
- दाभोळ या ठिकाणी नैसर्गिक वायू वीज केंद्र आहे.
- राजापूर येथे धुतपापेश्वर धबधबा आहे.
- रत्नागिरी येथे रत्नादुर्ग किल्ला व भागेश्वर मंदिर आहे.
- रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस (म्यानमारच्या थिबा राजाची समाधी)आहे.
- मिरकरवाडा हे मच्छीमारी केंद्र आहे.
- वेळास तालुका मंडणगड ही नाना फडणवीस यांची जन्मभूमी आहे. वेळास येथील “ऑलिव्ह रीडले कासव महोत्सव” प्रसिद्ध आहे.
- गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर गणपती मंदिर आहे.
- भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे.
- दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्य मुख्यालय आहे.
- लोटे परशुराम येथे परशुराम मंदिर आहे. (कोकण ही परशुरामाची भूमी गणली जाते).
- पावस येथे स्वामी स्वरूपनंदाची समाधी आहे.
- राजापूर जवळील उन्हाळे तीर्थक्षेत्रावरील लुप्त होणारी गंगा आहे.
- कातळशिल्पे – राजापूर तालुक्यात बारसू, देवाची गोठणे, सोलगाव, सोगमवाडी, गोवळ, शिवणे या ठिकाणी कातळशिल्पे आहेत.
- रत्नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. येथे पर्यटक संपूर्ण जगातून येत असतात.