भारताचे पंतप्रधान

संविधानातील भाग-5 प्रकरण-1 कलम-74, 75, 78 यामध्ये भारताचे पंतप्रधान Prime Minister यांची तरतूद आहे.

संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख “प्रधानमंत्री” (Prime Minister) असा आहे.

पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात.

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. या पद्धतीत “घटनात्मक प्रमुख” व “वास्तव कार्यकारी प्रमुख” असे दोन प्रमुख कार्यरत असतात.

राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख(de jure executive) तसेच राष्ट्रप्रमुख(Head of the State) असतात. राष्ट्रपती हा राज्यसंस्थेचा प्रमुख असतो.

पंतप्रधान हेच वास्तव कार्यकारी प्रमुख(de facto executive) तसेच शासन प्रमुख (Head of the Goverenment) असतात.

कलम 74 नुसार राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान असतो.

राष्ट्रपती हा कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च प्रमुख असला तरी त्याला आपले अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतात. राष्ट्रपती हा राज्यसंस्थेचा व पंतप्रधान या शासन संस्थेचा प्रमुख असतो.

कलम 75 नुसार पंतप्रधानाची नियुक्ती केली जाते.

पंतप्रधानांची निवड : (कलम 75) लोकसभेत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांची राष्ट्रपती पंतप्रधानपदी नेमणूक करतात व पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतात.

शपथ : पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात.

पंतप्रधान म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो. नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यास संस्थेच्या कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे क्रमप्राप्त ठरते.

पंतप्रधानांचा कालावधी:  संविधानाने पंतप्रधान यांचा कार्यकाल निश्चित केलेला नाही. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. मात्र, राष्ट्रपती पंतप्रधानांना आपल्या मर्जीप्रमाणे पदावरून केव्हाही दूर करू शकत नाहीत.

लोकसभेत बहुमत असेपर्यंत पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकतात.

लोकसभेचा विश्वास (बहुमत) गमावल्यास पंतप्रधान आपला राजीनामा देतात किंवा राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात.

भारताने ब्रिटन प्रमाणे संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. या शासन प्रणालीमध्ये वास्तव शासक पंतप्रधान असतो.

भारतीय पंतप्रधानाची तुलना अधिकाराच्या बाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी केली जाते.

पंतप्रधान हा मंत्रिमंडळरुपी कमानीची आधारभूत शिला असे वर्णन केले जाते.

पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.

राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यातील दुवा पंतप्रधान असतो.

भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष पंतप्रधान असतो व तो कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतात.

भारताचे दोन वेळा हंगामी पंतप्रधान बनलेले एकमेव व्यक्ती गुलजारीलाल नंदा हे आहेत.

Leave a comment